Wednesday, 22 March 2017

१९ आमदारांच्या निलंबनामागे राजकारण आहे काय?

१९ आमदारांच्या  निलंबनामागे राजकारण आहे काय?

देशात नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपमध्ये जी लाट निर्माण झाली आहे त्या लाटेने अनेक प्रस्तापित मोठ्या मोठ्या सत्ता गिळनकृत केल्या आहेत अन महाराष्ट्र देखील त्याला अपवाद राहिलेला नाही. २०१४ ला काँग्रेस राष्ट्रवादीचे १५ वर्षाचे सरकार जाऊन भाजप आणि शिवसेनेने सरकार स्थापन केलं. सत्तेत सामान वाटा भाजपने शिवसेनेला दिला नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी आहे, एकीकडे शिवसेना सत्तेची फळ चाखून देखील कधी कधी विरोधाची भूमिका पार पडत असते.भाजपची लाट मात्र रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी सह काँग्रेसला मोठं अपयश येत आहे. नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका ते आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पर्यंत राज्यात भाजपचं क्रमांक एकच पक्ष दिसतोय.
राष्ट्रवादी शिवसेना २-३ क्रमांकावर फेकलं गेले आहे तर काँग्रेस पार रसातळाला गेलं आहे.
आता हि भाजप ची लाट रोखायची असले तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनी एकच यायला हवं अशा चर्चाना उधाण आले आहे. अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेपासून भाजप ला दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या राज्यातील काही भागात कालच्या निवडणुकीत झालेल्या आहेत.

दि. २१ मार्च रोजी राज्यात जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली आणि अनेक ठिकाणी भाजप एक क्रमांकाला राहून किंवा मित्र पक्षांनी मदत केली नाही म्हणून सत्तेबाहेर बसली आहे.तर प्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आगळी वेगळी आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकरी कर्जमाफी वरून सभागृहात सर्वच पक्षांनी जोरदार मागणी लावून धरली आहे परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी कर्जमाफीबद्दल अवाक्षर देखील काढायला तयार नाहि. शिवसेनेने देखील वेळोवेळी कर्जमाफी केली नाही तर आम्ही सरकार मधून बाहेर पडू अश्या प्रकारच्या वलगण्या केल्या आहेत. शिवसेनेने सत्ता सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवलं तर आपलं काही खरं नाही असा धसका भाजप च्या मंडळींनी घेतला अन काल मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना राष्ट्रवादी व काँग्रेस च्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहात एकच गोंधळ घातला कर्जमाफी झालीच पाहिजे त्यासाठी टाळ मृदूंग घेऊन अनोखे आंदोलन त्यावेळी करण्यात आले, अर्थसंकल्पाची एक प्रत देखील सभागृहाबाहेर जाळून टाकण्यात आली सत्ताधारी भाजपने या नामी संधीचा फायदा घेत १९ आमदारांना निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. सभापतींनी देखील तात्काळ कसलाही विचार न करता तब्बल ९ महिन्यांसाठी राष्ट्रवादीचे १० व काँग्रेसचे ९ असे एकूण १९ आमदारांना सभागृहाच्या कामकाजात अढथळा निर्माण केला कारण देत निलंबित केलं.
आता प्रशा असा उपस्थित होतो कि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणं गुन्हा आहे काय, अन असेल तर त्याला एवढी कठोर शिक्षा आहे का ?
एकीकडे भर सभेत सैनिकांच्या पत्नीबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे विधपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी सभागृह दणाणून ठेवले तरी १५ दिवस काहीच निर्णय या सरकारने घेतला नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागता म्हणून निलंबन हि दुपटी भूमिका नाही का?
हे सरकार दमदाटी करतय, लोकशाहीचा गळा घोटणारे हे कृत्य आहे असा आरोप दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांकडून झाला त्यानंतर ५० आमदारांच्या शिष्टमंडळांनी निलंबन मागे घ्यावं यासाठी राज्यपालांना पत्र दिले आहे.
आता मुद्दा असा आहे कि निलंबन हे राजकारण आहे का ?
तर
आज विधानसभेतील २८८ आमदारांपैकी भाजप १२२, शिवसेने ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप ३, बहुजन विकास आघाडीचे ३, एमआयएम २, रासप १, भारिप १, सपा १, मनसे १, कॉम्युनिस्ट १, अन्य ७ असं राज्यातील संख्याबळ आहे.
युतीच्या सत्तेतून शिवसेना बाहेर पडली तरी १९ आमदार निलंबित केल्यानंतर राहिले २६९ आणि बहुमतासाठी १३५ संख्याबळाची आवश्यकता आहे. भाजप १२२ + रासप १ असे एकूण १२३ आणखी १२ आमदारांची गरज आहे ते सहज शक्य आहे अनेक अपक्ष आमदारांचे भाजप प्रवेश झालेले आहेत तर सत्तेसाठी ते पाठिंबा देऊ शकतात.
याउलट शिवसेना ६३, काँग्रेस ४२ - ९ = ३३ , राष्ट्रवादी ४१-१० = ३१ एकूण फक्त १२७ जे बहुमत गाठण्यासाठी केवळ अशक्य आहे.

या सर्व बाबीवरून एकच गोष्ट निदर्शनास येतेय कि भारतीय जनता पक्ष साम, दाम, दंड, भेद या सर्वच गोष्टींचा वापर करत राजकारण करत आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यादोन्ही विरोधी पक्षांना अजुन म्हणावं अशी जनतेची विश्वसाहार्ता कमावता आलेली नाही.

Monday, 27 February 2017

आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांचे वर्चस्व कायम

"आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांचे वर्चस्व कायम"
शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
 
वार्ताहर ता.२७ : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावो गावी करोडो रुपयांची विकासकामे झाल्यामुळे मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.शिवसेनेला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे, एकंदरीत शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.
 
जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार जागा राष्ट्रवादीला , एक जागा शिवसेनेला तर पंचायत समितीमध्ये दहा पैकी सहा जागा राष्ट्रवादीला, तीन जागा शिवसेनेला तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. यानिवडणुकीत भाजप काँग्रेस पक्षाने देखील उमेदवार उभे केले होते परंतु त्यांना खाते देखील उघडता आलेले नाही.
 
 'वळसे पाटील यांनी २७ वर्षात काय विकास केला' अशी जहरी टीका आढळरावांकडून करण्यात आली होती या टीकेचा समाचार घेत वळसे पाटील यांनी देखील 'विमानतळ खेडमधून का गेले , विकास आराखड्याचा काय झालं' असे मुद्दे पुढे करत पलटवार केला. विकास काम सांगण्यावरच त्यांनी भर दिला. 
 
गेल्या १५ वर्षात शिवसेनेला आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अपयश येत आहे. यंदा जुन्नर आणि खेड तालुक्यात पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आलेली आहे परंतु खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगावात आपला करिष्मा दाखवण्यात पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत.
 
शिवसेनेकडून जि.प. माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी यंदा पारगाव-अवसरी या वळसे पाटील यांच्या घरच्या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीकडून वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील रिंगणात होते, संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. अटी तटीच्या या सामन्यात विवेक वळसे पाटील यांनी बाजी मारली परंतु जास्तीचे मताधिक्य भेटू शकले नाही. गिरे यांना स्वतःच्या मेंगडेवाडीमध्ये मताधिक्य भेटू शकले नाही तर विवेक वळसे पाटील यांना अवसरी या विद्यमान जि.प. सदस्य रेवती वाडेकर यांच्या गावात मताधिक्य भेटले नाही. पारगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे संजय गवारी तर अवसरी गणातून शिवसेनेचे रवींद्र करंजखिले निवडून आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले देविदास दरेकर हे कैलासबुवा काळे यांच्या विरोधात खासदार आढळराव याचा बालेकिल्ला असणारा पेठ-घोडेगाव या गटामधून निवडून आले. मंचर-अवसरी जि प गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा दत्तात्रय थोरात या शिवसेनेच्या प्रज्ञा सुरेश भोर याच्या विरोधात निवडून आल्या.अवसरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे वसंत राक्षे यांनी पक्षांतर करून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु राष्ट्रवादीचे संतोष यमनाजी भोर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. मंचर-वडगाव-वाळुंजवाडी गणातून अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी मंचरकरांची सहानभूती मिळवून एक नंबरचे मताधिक्य घेत विजय संपादित केला. 
कळंब-चांडोली जि प गटातून राष्ट्रवादीच्या तुलसी सचिन भोर यांच्या सह पंचायत समितीच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या रणनीतीपुढे शिवसेनेचे पानिपत झाले. 
अमोंडी-शिनोली जि प गटातून रूपा जगदाळे या ५००० पेक्षा जास्त मताधिक्याने घेऊन विजयी झाल्या. सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पंचायत समितीच्या जागा देखील चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. 

या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळाले नसले तरी तालुक्यात विधानसभा निवडुकीपेक्षा यावेळी शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य ही राष्ट्रवादी काँगेससाठी धोक्याची घंटा आहे.

Thursday, 2 February 2017

दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील पण..........!



गेल्या २ वर्षांपासून अडचणीत सापडलेला दुग्धव्यवसाय आज चांगली प्रगती करतोय, आंतराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे वाढलेले दर आणि आज बाजारात दुधाचा असलेला तुटवडा त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध विक्री दरात कमालीची वाढ झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चित समाधान उमटले आहे परंतु अशात पशुखाद्य व गाईंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ५० ते ६० हजार रुपयांना जी गाई भेटत होती तिची किंमत आज ९० हजार ते १ लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे. आधीच खाजगीकरणामुळे राज्यातील दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत त्यात अमूल आणि नंदिनीचा महाराष्ट्रातील प्रवेशाने भल्या-भल्यांची दूध सम्राटांची झोप उडाली आहे.
         अमूल सारख्या देश पातळीवर नावलौकिक पावलेल्या ब्रँड ने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात चांगलाच जम बसवला आहे. गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील हा सहकारी संघ एवढा मोठा झाला कसा याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित एक गोष्ट समोर येते ती म्हणजे त्यांच्या कामाची पारदर्शकता. भ्रष्टाचाराच्या किडीने आज संपूर्ण देशाला पोखरून टाकलेले आहे, कुणी कितीही ठरवलं तर त्यातून सहज सहजी सुटका होत नाहीये याच एक जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर ट्राफिक हवालदाराला पावती नको म्हणून १०० रुपये टेकवून आपण पुढे जातो हे कटू सत्य आहे. प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं दूध त्याच्या समोर तपासून त्याला प्रतवारीनुसार दर देणारी अमूल हि महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. दुधाचे वजन, प्रतवारी अन त्यानुसार भाव याची गोळाबेरीज करून हि संस्था त्या शेतकऱ्याला तात्काळ दररोजची दररोज पावती करून देते. शेतकऱ्यांना हि पारदर्शकता भावते याउलट वर्षानुवर्षे दूधउत्पादक शेतकरी बांधवाना आपल्या मोठमोठ्या दुग्धसम्राटांनी अडाणी ठेवण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्याला वजनात आणि प्रतवारीत मारायचं अन नंतर गोळा झालेल्या सर्व दुधात पाणी ओतून पुढे पाठवायचं हा त्यांचा प्रमुख धंदा, बरं याविषयी आवाज आज अखेर कुणी उठवलेला नाही ही आपली शोकांतिका आहे. अडलेल्या गवळल्याला लाखभर रुपये द्यायचे अन फोडाफोडीचं राजकार करायचं, पुढे काही दिवस त्याचा विश्वास सांभाळायचा अन नंतर वजन आणि प्रतवारीत मारायचं अन आपला फाळका काढायचा हे ठरलेलं आहे.
       नवनवीन ब्रँडच्या नावाखाली पशुखाद्य आज कुणीही बनवू लागलं आहे, वेगवेगळी प्रलोभने दाखवून शेतकऱ्यांना लुबाडायचं काम दिनरात सुरु आहे. सरकी पेंड च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मोठे मोठे ट्रेडर्सवाले स्टॉक करून ठेवतात अन उन्हाळ्यात १००० रूपयांचे पोते १६०० पर्यंत नेऊन ठेवतात, उघड गवळ्याला लुटायचा कसं तर यांच्याकडून शिकावं. शेतकऱ्याने शेण खायचं अन शहरातील बड्या लोकांच्या पोरांनी त्या दुधापासून बनलेली आईस्क्रिम खायची, हे चित्र किती दिवस दिसणार ही परिस्थिती बदललीच पाहिजे.
          राज्यातील दूध संघाने खाजगी उद्योगाला न घाबरता आपल्या कामात पारदर्शकता आणून स्पर्धेत टिकणं गरजेचं आहे. सरकारने दूध संघाला विश्वासात घेऊन दुधाचे धोरण ठरवण्याची नितांत गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर या धंद्यात आमूलाग्र बदल करणे गरजेचं आहे अन असं झालं तर खरंच चांगले दिवस येतील.

समीर प्रभाकर थोरात 

Monday, 30 January 2017

बैलगाड्यांच्या शर्यतींना सशर्त परवानगी द्यावी

बैलगाड्यांच्या शर्यती ही महाराष्ट्राची परंपरागत संस्कृती आहे. ग्रामीण भागात ग्राम दैवतांच्या उत्सवानिमित्त यात्रा पार पडते त्यात मुख्य आकर्षण बैलगाडा शर्यतींचे असते. यामुळे कामानिमित्त विखुरलेला समाज एकत्र येतो, पै पाहुणे घरी येतात, शेतकरी वर्ग लहान मुलांमध्ये एक आनंदाच वातावरण असत. आपली सर्व दु:ख विसरुन नावालाच फक्त राजा असणारा माझा शेतकरी त्या दिवशी एक दिवस का होईना राजा म्हणून मिरवतो. यात्रेमध्ये गोरगरीब लोकांची दुकाने मोठ्या थाटाने ऊभी राहत. त्या निमित्ताने पैशाची देवाणघेवाण होऊन मोठी आर्थिक उलाढाल होते. शेतकरी वर्ग एक दिवस का होईना खुष राहायचा पण बैलगाडा शर्यत बंदीच्या जाचक निर्णयाने गरिबांच्या पोटावर पाय पडला. खेळणी, छोटे हॉटेल व्यावसायिक, वाजंत्री, ऊसाचे रसवाले व यात्रे निमित्त व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यवसायिक आज अडचणीत आलेत, या बंदीने परंपरेनुसार चालत आलेली संस्कृती मोडकळीस चालीय कि काय ही भीती वाटू लागली आहे. कुठे तरी हे थांबायलाच हव नाहीतर बैल हा प्राणी पुढच्या पिढीला पुस्तकात शोधावा लागेल. महाराष्ट्रात खिल्लार अन कर्नाटकातील म्हैसूर जातीचे बैल चपळ असल्यामुळे शर्यतीमध्ये या बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बैल बाजार देखील बंदीमुळे थंडावले आहेत. यांत्रिकी करणामुळे शेतीच्या कामातून बैलांचा वापर फार कमी झाला आहे. एकीकडे सरकार गोवंश वाचावा म्हणून प्रयत्न करतंय तर दुसरीकडे ही अशी बंदी घालून शेतकऱ्याला अडचणीत टाकतय. बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांचा छळ होतो, कृरपणे वागवलं जात असं स्पष्ट करत केंद्र सरकारने जुलै २०११ मध्ये एक अद्यादेश काढून बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. बैलगाडा मालकांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेल्या त्यानंतर त्याठिकाणी बैल, वळू आणि सांड या संज्ञेवर युक्तिवाद करून १२ सप्टेंबर २०१२ रोजी बैलगाडा मालकांनी बाजी मारली. त्यानंतर शर्यत पूर्ववत चालू झाली. पुढे २ महिन्यातच प्राणी मित्र संघटनांनी बैल, वळू आणि सांड हा एकाच प्राणी आहे असं न्यायालयाला पटून दिल व २६ नोव्हेंबर २०१२ रोजी बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी आली. मुंबई उच्चं न्यायालयात निर्णय विरोधात गेल्यामुळे बैलगाडा संघटनांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले तिथे दोन्ही बाजूनी जोरदार आरोप प्रत्यारोप होत शेवटी सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी शर्यत बंदीच्या निर्णयाला काही नियम अटी घालून स्थगिती दिली. त्यानंतर शर्यती पुन्हा धुमधडाक्यात चालू झाल्या. दरम्यान ज्या नियम व अटी कोर्टाने दिल्या होत्या त्या काही ठिकाणी पाळल्या गेल्या नाही. त्यात काही प्राणी मित्र संघटना खोटे पुरावे गोळा करत पुन्हा कोर्टात गेले अन ७ मे २०१४ रोजी सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदीचा अंतिम निकाल दिला. बैलगाडा मालकांमध्ये पुन्हा निराशेचे वातावरण झाले एवढा संघर्ष करत कोर्ट विरोधातच निर्णय देत होते. केंद्रात २६ मे २०१४ नंतर भाजप सरकार आले. सर्व बैलगाडा मालकांचा अन संघटनांचा एकच आग्रह होता आता केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करावा अन यामागणासाठी बैलगाडा मालकांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे साकडे घातले. तामिळनाडू राज्यातील जल्लीकट्टु ही स्पर्धा संक्रांतीला असते त्यापार्श्वभूमीवर तब्बल २ वर्षांनी केंद्र सरकारने ७ जानेवारी २०१६ ला नवीन राजपत्र काढून त्यात नियम व अटी टाकून शर्यतींना परवानगी दिली. परंतु सर्व प्राणी मित्र संघटना त्या निर्णयाविरोधात एक झाल्या आणि त्यानिर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले. बैलगाडा संघटनानी देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतली परंतु १२ जानेवारी २०१६ च्या सुनावणी मध्ये कोर्टाने पुन्हा त्या निर्णयाला स्थगिती दिली अन बैलगाडा मालकांच्या पदरी घोर निराशा पडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत, तामिळनाडू मधील जल्लीकटू , कर्नाटक मधील कंबाला सह पंजाब मधील किला रायपूर बैलगाडी शर्यत बंद आहेत. तमिळनाडू मध्ये संक्रांतीच्या मुहूर्तावर होणाऱ्या जल्लीकट्टू स्पर्धा हा तमिळीयन जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असतो. तिथे सर्व राज्यामध्ये या स्पर्धा होतात परंतु यंदा देखील त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे तिथे खुप अस्वस्थेचे वातावरण होते. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे तो निकाल लवकर द्यावा असा तमिळनाडू सरकाने कोर्टाकडे आग्रह धरला होता परंतु आमच्या कामकाजात हस्तक्षेप करु नका अस सांगत कोर्टाने त्यांना फटकारले. जल्लीकट्टू स्पर्धा झालीच पाहिजे दोन दिवसात आमच्या मागण्या मान्य करा असा आक्रमक पवित्र घेत मरिना बीचवर मोठ्या संख्येने तमिळनाडुतील जनतेने भव्य आंदोलन केले. त्याची दखल त्यांच्या राज्यसरकारने घेतली व चार दिवसात नवीन अध्यादेश काढून केंद्रातील सर्व परवानग्या घेऊन जल्लीकटू स्पर्धा सुरु केली. प्राणिमित्र संघटना आरोप करतात शेतकरी बैलांना मारहाण करतात, दारु पाजतात, मिर्चीची पुड डोळ्यात टाकतात वगैरे वगैरे परंतु या एकाही आरोपात तथ्य नाही किंवा तसा पुरावा देखिल नाही. दारु पिऊन माणुस सरळ चालु शकत नाही तर एका रेषेत धावने लांबच. धादांत खोटे आरोप करुन शेतकर्याला नाडण्याच काम या पेटा संघटनेने केले आहे. पोटच्या पोरापेक्षा जास्त आपल्या जित्राबावर प्रेम करनारा माझा बळिराजा येवढा निष्ठूर नाही. घोड्यांच्या शर्यतीत अपघात होतात, साखर कारखान्यांमध्ये ३ टनापेक्षा जास्त ऊस बैल वाहुन नेतात, कत्तलखाने सर्रास चालु आहेत तिथे कधीच या प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतला नाही. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना एक रुपयाची देखील मदत या स्वंयघोषित प्राणीमित्रांनी केली नाही. एनजीओच्या नावाखाली परदेशातुन पैसे लाटायचे व इथल्या शेतकर्यांना नाडायच येवढच काम या पेटा संस्थेने केल आहे, या संस्थेवर सरकारने बंदी घालावी व तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील लवकरात लवकर अशाप्रकारे कायदा करून शर्यत चालू कराव्यात किंवा केंद्र सरकारच्या १९६० च्या प्राणी कृरता कायदा अनुच्छेद २२ मध्ये सुधारणा करून शर्यतींना सशर्त परवानगी द्यावी. - समीर प्रभाकर थोरात

Monday, 2 January 2017

त्यानंतर आख्खा गाव अंगठाछाप माणसाला मास्तर म्हणु लागला

माझ्या आजोबाला 'गोविंदा मास्तर' का म्हणन होते त्याच कारण आज समजलं आज एक बुजुर्ग व्यक्तिमत्व भेटल सहज बोलताना माझ्या कुटुंबाचा विषय निघाला. ते म्हटले तुला तुझ्या आज्याला मास्तर का म्हणत होते माहीत आहे का? म्हटल नाय, मी सांगतो म्हटले तुला किस्सा "तुमच्याकडं बकरं होती १९४८ ला आम्ही १५० रुपयाला १ खंडी बकर घेतली. नंतर तुझा आजा मुंबईला जाऊन तिकड कंपनीत काम करीत होता.गावाला आल्यावर एक दिवस तुझा आज्जा फिरत फिरत मांजरवाडीला गेला होता तिथं एका माणसाच्या बकरांमधी त्यांना तुमची बकर दिसली. त्या बकरावाल्यान अट टाकली तुम्ही जर बरोबर ओळखली तर तुमची बकर तुम्हाला देऊन टाकु. त्यांनी ४ वर्षानंतर त्या कळपातुन बरोबर ७ बकर बाजुला काढली. समोरचा बकरावाला नतमस्तक झाला अन म्हटला खरच तुम्ही यातल "मास्तर" आहात राव.४ वर्षानी बकर तुम्ही तुमची बकर वळखुन काढली म्हणजे खरच तुम्ही मास्तर आहात. त्यानंतर आख्खा गाव अंगठाछाप माणसाला मास्तर म्हणु लागला